Congress: काँग्रेसचा प्लॅन ठरला! 'भारत जोडो यात्रा' संपताच...

भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसची पक्ष वाढीसाठी नवी घोषणा
rahul gandhi
rahul gandhiesakal

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसने पुढील पक्ष वाढीची घोषणा केली आहे. काँग्रेस कडून सांगण्यात आलं आहे की, 'भारत जोडो यात्रे'नंतर 26 जानेवारीपासून देशभरात 'हाथ से हाथ जोडो अभियान' सुरू करणार आहे. या प्रचारासाठी पक्ष ब्लॉक, पंचायत आणि बूथ स्तरावर जनसंपर्क करणार आहे.

काँग्रेसचे नेते के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, 'भारत जोडो यात्रा' संपल्यानंतर 26 जानेवारीपासून देशभरात 'हाथ से हाथ जोडो' अभियान सुरू केले जाईल, ज्या अंतर्गत ब्लॉक, पंचायत आणि बूथ स्तरावर लोकांशी संपर्क साधला जाईल.

वेणुगोपाल यांनी सांगितले की, हे अभियान दोन महिने चालणार आहे. या अभियाना मार्फत राहुल गांधी यांचे पत्र देखील लोकांच्या हाती दिले जाणार आहे, ज्यामध्ये या अभियानाचा संदेश असेल आणि त्यासोबत मोदी सरकारच्या विरोधात एक आरोपपत्रही जोडले जाईल.

rahul gandhi
Amol Kolhe: शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान! खासदार कोल्हेंनी प्रसाद लाडांना जोडले हात; म्हणाले...
rahul gandhi
Dipali Sayyed: दीपाली सय्यद स्वार्थासाठी पक्षांतर करतात का? अभिनेत्री म्हणाल्या...

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, 'भारत जोडो' यात्रा 24 डिसेंबरला दिल्लीत पोहोचेल आणि 26 जानेवारीला श्रीनगरमध्ये यात्रेची सांगता होईल. या नंतर 'हाथ से हाथ जोडो अभियान' अंतर्गत तीनस्तरीय कार्यक्रम होणार आहे. ब्लॉक आणि बूथ स्तरावर यात्रा काढण्यात येणार आहेत.

तर जिल्हा स्तरावर अधिवेशने आणि राज्य स्तरावर रॅली काढण्यात येणार आहेत. यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वड्रा आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेते 'हथ से हाथ जोडो अभियान'शी संबंधित कार्यक्रमांना उपस्थित राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com