

नवी दिल्ली : क्रांतिकारक भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी ब्रिटिशांचा विरोध करताना केंद्रीय असेंब्लीत बॉम्बस्फोट घडवून क्रांती संदेश असलेली पत्रके भिरकावली होती. ऐतिहासिक दस्तावेज असलेली ही पत्रके सरकारने ब्रिटनमधून भारतात परत आणावीत, अशी मागणी काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली.