बंगळूर : ‘‘कर्नाटकातील मतदारांविरुद्धच नव्हे तर देशभरात अनेक मतदारसंघात ‘मतचोरी’ची कृत्ये घडली आहेत, हे सिद्ध करण्यासाठी मोहीम सुरूच ठेवणार आहे,’’असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बंगळूरमधील फ्रीडम पार्क येथे, काँग्रेसने आयोजित केलेल्या निषेध रॅलीत बोलताना शुक्रवारी केला.