

नवी दिल्ली : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी नवे आर्थिक वर्ष आनंदाचे ठरणार आहे. नुकत्याच सुरू झालेल्या या आर्थिक वर्षात अनेक कंपन्यांनी कर्मचारीभरतीबाबत सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला आहे. पात्र उमेदवारांची मुलाखत घेतलेल्या ४५ टक्के कंपन्यांनी कायमस्वरूपी पदांसाठी भरती करण्याची योजना आखल्याचे मनुष्यबळ सेवा क्षेत्रातील ‘जीनियस कन्सल्टंट्स’ या कंपनीने अभ्यासअहवालात म्हटले आहे.