देश विखारी चक्रात अडकला होता पण...; काँग्रेसवर टीका करत मोदींचं विधान

गेल्या आठ वर्षात भारताने जी उंची गाठलीये, त्याची कल्पनाही कोणी केलं नसेल, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
PM Modi
PM Modi sakal

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारला आज आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्या काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. लहान मुलांसाठी पीएम केअर फंडांतर्गत योजनाचं लोकार्पण करण्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. २०१४ पूर्वी देश घोटाळे आणि घराणेशाहीच्या गर्तेत अडकला होता, अशी टीकाही त्यांनी केलं. (PM Narendra Modi on Congress)

PM Modi
प्रसिद्धी, व्यवस्थापनातून मतांचं भरघोस पीक, मोदी सरकारची आठ वर्ष

पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) या कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, "आज जेव्हा आमचं सरकार आठ वर्षे पूर्ण करत आहे, या देशाचा आत्मविश्वास, देशवासियांचा आत्मविश्वास अभूतपूर्व आहे. २०१४ पूर्वी हजारोंचे घोटाळे, भ्रष्टाचार, घराणेशाही, देशभरात पसरलेल्या दहशतवादी संघटना, प्रादेशिक भेदभाव या सगळ्यामुळे देश एका विखारी चक्रात अडकला होता".

PM Modi
शेतकऱ्यांना महागाईची झळ बसू दिली नाही - नरेंद्र मोदी

मोदी पुढे म्हणाले, "गेल्या आठ वर्षांमध्ये देशाने जी उंची गाठलीये, त्याची कल्पना यापूर्वी कोणी केली नसेल. आज भारताची मान जगभरात उंचावलेली आहे. आपल्या भारताची शक्ती जागतिक व्यासपीठांवर वाढलेली आहे. आणि मला आनंद आहे की हा भारताचा प्रवास युवकांच्या नेतृत्वाखाली होत आहे".

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com