Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

Rahul Gandhi and Akhilesh Yadav rally: अखिलेश यादव हे जेव्हा व्यासपीठावर पोहोचले तेव्हा कार्यकर्ते नियंत्रणाबाहेर गेले. त्यांनी बॅरिकेट तोडून व्यासपीठावर येण्याचा प्रयत्न केला.
Rahul Gandhi and Akhilesh Yadav
Rahul Gandhi and Akhilesh Yadav

लखनऊ- काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांची आज प्रयागराजच्या फूलपूर येथे सभा नियोजित होती. पण, त्यांच्या सभेमध्ये गोंधळ उडाल्यामुळे त्यांना भाषण न करताच तेथून काढता पाय घ्यावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, कार्यकर्ते बॅरिकेड तोडून स्टेजच्या जवळ पोहोचले होते. त्यामुळे परिस्थिती ओळखून भाषण न करताच दोन्ही नेते तेथून निघून गेले.

गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. यात काहीजण जखमी झाले आहेत. सपा प्रमुख अखिलेश यादव हे जेव्हा व्यासपीठावर पोहोचले तेव्हा कार्यकर्ते नियंत्रणाबाहेर गेले. त्यांनी बॅरिकेट तोडून व्यासपीठावर येण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर इतर नेत्यांच्या सल्ल्याने राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी तेथून भाषण न करता निघण्याचा निर्णय घेतला.

Rahul Gandhi and Akhilesh Yadav
Jalgaon Lok Sabha Constituency : लोकसभा निकालानंतर चाळीसगावातील राजकारणाला कलाटणी; आमदार मंगेश चव्हाण यांच्या वर्चस्वाचा फैसला

फूलपूरमध्ये इंडिया आघाडीची सभा होती. त्यासाठी राहुल गांधी आधीपासूनच व्यासपीठावर उपस्थित होते, काही वेळाने अखिलश यादव त्याठिकाणी आले. त्यानंतर समोर असलेले कार्यकर्ते पुढे सरकले. त्यांच्यासमोर बॅरिकेड होते, पण त्यांनी बॅरिकेड तोडून पुढे येण्यास सुरुवात केली. त्यांना पुढे न येण्याचं आवाहन करण्यात आले, पण कार्यकर्त्यांनी बॅरिकेड तोडले अन् ते व्यासपीठाच्या जवळ येऊन पोहोचले.

अखिलेश यादव यावेळी कार्यकर्त्यांना म्हणाले की, 'आम्ही आमचं म्हणणं तुमच्यापुढे ठेवण्यासाठी आलो आहे. आम्हाला कल्पना आहे की, तुम्ही उत्साही आहात. असाच उत्साह तुम्हाला मतदानाच्या दिवसापर्यंत कायम ठेवायचा आहे. मागे देखील मी आलो होते पण मला माझं म्हणणं तुमच्यापुढे मांडण्याची संधी मिळाली नव्हती. तरी तुम्ही सपाला मतदान केलं.'

Rahul Gandhi and Akhilesh Yadav
लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यापासून पैशांचा पाऊस... आतापर्यंत 9 हजार कोटींची रोकड जप्त! गुजरात पहिल्या नंबरवर

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. एकूण ७ टप्प्यामध्ये देशात मतदान होणार आहे. त्यातील पाचव्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडणार आहे. यावेळी एकूण ४९ मतदारसंघामध्ये मतदान होईल. महाराष्ट्रातील १३ मतदारसंघातील उमेदवारांचे भविष्य उद्या मतपेढीत कैद होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com