Manipur : पाच जिल्ह्यांमधील संचारबंदी मागे; मणिपूरमध्ये पोलिसांकडे १४० शस्त्रे जमा

शहा यांनी त्यांच्या चार दिवसांच्या दौऱ्यामध्ये विविध राजकीय पक्षांची शिष्टमंडळे, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला
Curfew lifted in five districts 140 weapons stored with police in Manipur
Curfew lifted in five districts 140 weapons stored with police in Manipuresakal

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शांती प्रक्रियेची घोषणा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी मणिपूरच्या पाचही जिल्ह्यांतील संचारबंदी आज मागे घेण्यात आली. मंत्री शहा यांच्या इशाऱ्यानंतर स्थानिकांनी १४० शस्त्रे आज पोलिसांकडे सुपूर्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मागील महिन्यामध्ये हिंसाचाराचा भडका उडाल्यानंतर दंगेखोरांनी पोलिसांच्या शस्त्रागारातून दोन हजारांपेक्षाही अधिक शस्त्रे लुटली होती. शहा यांनी त्यांच्या चार दिवसांच्या दौऱ्यामध्ये विविध राजकीय पक्षांची शिष्टमंडळे, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी संवाद साधला होता. राज्यातील हिंसाचाराचा सखोल तपास करण्यासाठी शांती समितीच्या स्थापनेची घोषणाही त्यांनी केली होती.

Curfew lifted in five districts 140 weapons stored with police in Manipur
Mumbai : राखीव अधिवासातील जमिनीच्या भरपाईपोटी त्याच क्षेत्रात जमीन द्यावी लागणार

मागील २४ तासांमध्ये १४० शस्त्रे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. यामध्ये ‘एके-४७, इन्सास रायफली, अश्रुधुराच्या नळकांड्या,स्टेन गन, ग्रेनेड लॉँचर आणि दीर्घपल्ल्याचा मारा करणाऱ्या पिस्तुलांचा समावेश आहे.

शस्त्रागारातून पळविण्यात आलेली शस्त्रे जप्त करण्यासाठी पुन्हा शोध मोहीम राबविण्याचा इशारा गृहमंत्र्यांनी दिला होता. बंडखोरांच्या गटांनाही त्यांनी कराराचे पालन करण्याची सूचना केली होती. तुम्ही नियम पाळणार नसाल तर कायदा त्यांचे काम करेल शहा म्हणाले होते.

Curfew lifted in five districts 140 weapons stored with police in Manipur
Pune Accident : बोअरवेल ट्रक खाली सापडून तरुणीचा जागीच मृत्यू

केंद्र सरकारने २००८ मध्ये ‘युनायटेड पीपल्स फ्रंट’ आणि ‘कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन’सोबत करार केले होते. या दोन्ही बंडखोरांच्या संघटनांकडे २ हजार २०० एवढे स्वयंसेवक असून त्यांनी अद्याप शस्त्रांचा त्याग केलेला नाही. मणिपूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सध्या दहा हजार जवान कार्यरत आहेत. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या हिंसाचार थांबला असून सुमारे दहा जिल्ह्ात शांतता असल्याचे सांगितले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com