देशातील नक्षल हिंसाचारात घट - जी. किशन रेड्डी

G-Kishan-Reddy
G-Kishan-Reddy

नवी दिल्ली - देशातील विविध राज्यांतील विशेषत: नक्षलग्रस्त भागातील हिंसाचारात तीन वर्षात घट झाल्याची माहिती आज संसदेत देण्यात आली. गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेत लेखी प्रश्‍नोत्तराच्या तासात नक्षल हिंसाचार कमी झाल्याचे म्हटले आहे. 

देशात नक्षल हिंसाचाराच्या २०१७ रोजी ९०८, २०१८ रोजी ८३३ आणि २०१९ रोजी ६७० घटना घडल्याचे रेड्डी यांनी सांगितले. त्याचवेळी नक्षलग्रगस्त राज्यात नागरिकांच्या मृत्यूचे प्रमाणही कमी होत असल्याचे ते म्हणाले. २०१७ रोजी १८८, २०१८ रोजी १७३ आणि २०१९ रोजी १५० नागरिकांचा नक्षलवादी हल्ल्यात आणि हिंसाचारात मृत्यू झाला आहे.

२०१७ रोजी ७५ जवान हुतात्मा झाले, तर २०१८ रोजी ६७ आणि २०१९ मध्ये ५२ जवानांना प्राणास मुकावे लागले. तसेच विविध राज्यांत २०१७ रोजी १३६ नक्षलवादी मारले गेले. २०१८ मध्ये २२५ आणि गेल्या वर्षी १४५ नक्षलवादी ठार झाले. २०१७ रोजी १८८८ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. २०१८ रोजी १९३३ तर २०१९ रोजी १२७६ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com