Farmers Protest: शेतकऱ्यांचा आज पुन्हा 'दिल्ली चलो'चा नारा; रेल्वे स्टेशन, बस स्टँडवर पोलिसांचा चौख बंदोबस्त

Delhi chalo call by farmers : आज शेतकरी नेत्यांनी सरकारला दिलेली डेडलाईन संपत आहे. त्यामुळे आज हजारो शेतकरी दिल्लीकडे कूच करतील.
Farmers Protest
Farmers Protestesakal

नवी दिल्ली- शेतकरी नेते आणि केंद्र सरकारमध्ये अद्याप तोडगा निघालेला नाही. शिवाय आज शेतकरी नेत्यांनी सरकारला दिलेली डेडलाईन संपत आहे. त्यामुळे आज हजारो शेतकरी दिल्लीकडे कूच करतील. मोठ्या प्रमाणात शेतकरी दिल्लीत दाखल होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.(Delhi chalo call by farmers protest Police deployment enhanced at railway stations bus stands)

दिल्लीच्या सीमेवर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांची तैनाती करण्यात आली आहे. तसेच नवी दिल्ली आणि मध्य दिल्लीमध्ये सुरक्षा चौख करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नेते आणि सरकार यांच्यामध्ये एमएसपीच्या मुद्द्यावरुन चर्चा सुरु आहे. पण, अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उचललं आहे.

Farmers Protest
Farmers Protest: शेतकरी आंदोलन पेटणार! १० मार्च रोजी देशभरात रेल रोको आंदोलन, शेतकरी नेत्यांनी सांगितली पुढची रणनिती

केंद्र सरकारवर दबाव

सरवन सिंग पंढेर आणि जगजीत सिंग डल्लेवाल यांच्या नेतृत्त्वामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सरकारने एमएसपीचा मुद्दा मान्य न केल्यास मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी दिल्लीत यावे असं आवाहन या नेत्यांनी केलं होतं. ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन दिल्लीत यावं. ज्यांना शक्य नाही त्यांनी रेल्वेने आणि बसने दिल्लीत यावे असं ते म्हणाले होते.

नवी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणी आंदोलन करताना आढळल्यास त्याला ताब्यात घेतले जाणार आहे. केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी देशभरातून शेतकरी दिल्ली येण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांची संख्या यात जास्त असण्याची शक्यता आहे. दाव्यानुसार, दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमीच असण्याची शक्यता आहे.

Farmers Protest
Farmer's Protest: आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे पासपोर्ट, व्हिसा होणार रद्द! हरयाणा पोलिसांचा इशारा

१० मार्चपासून रेल रोको

सूत्रांच्या माहितीनुसार, शेतकरी छोट्या-छोट्या गटामध्ये दिल्लीमध्ये येऊ शकतात. पंढेर यांनी ३ मार्चला पत्रकार परिषद घेऊन आंदोलन पुन्हा सुरु केले जाण्याची घोषणा केली होती. शिवाय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलं होतं. सरकारसोबत तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाणार आहे. १० मार्चपासून रेल रोको करण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com