Dr. Mohan Bhagwat
sakal
लखनौ - ‘हिंदू समाजाला कोणाचा धोका नसला तरी सावध राहणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागत यांनी नुकतेच एका भाषणात केले. लखनौ येथील सरस्वती शिशू मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हिंदू समाजाने एकत्र यावे आणि सामर्थ्य संपादन करावे; त्याचप्रमाणे हिंदू कुटुंबाने किमान तीन अपत्यांचा जन्म देण्याबाबत विचार करावा असे आवाहनही भागवत यांनी यावेळी केले.