Dr.Tara Bhawalkar : मराठी भाषा संतांनी टिकवली : भवाळकर
Marathi Sahitya Sammelan : डॉ. तारा भवाळकर यांनी दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात मराठी भाषेचा जन्म आणि त्याच्या जिवंततेचे महत्व स्पष्ट केले. संतांच्या स्मरणामुळे मराठी भाषा टिकली, असे त्यांनी सांगितले.
नवी दिल्ली : ‘‘महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचे स्मरण करायला लावणारी मराठी भाषा संतांनी टिकवली. भाषा ही जैविक गोष्ट आहे. ती बोलल्यानेच जिवंत राहते. नुसती पुस्तके आणि ग्रंथांतून जिवंत राहात नाही.