india ai impact conference
sakal
नवी दिल्ली - कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) समाजासाठी खऱ्या अर्थाने उपयोगी ठरणार असेल, तर ती सर्वांनी मिळून विकसित करून वापरली गेली पाहिजे. उद्योग क्षेत्र, सरकार आणि समाजातील विविध संघटना एकत्र येऊन ‘एआय’चे फायदे प्रत्येक नागरिकापर्यंत कसे पोहोचविता येतील, यावर आज ‘एआय इम्पॅक्ट इंडिया समिट’मध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आले. ‘भारताच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी सामूहिक कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ या विषयावर झालेल्या या चर्चासत्रात ‘सकाळ माध्यम समूहा’च्या संचालक जान्हवी पवार यांनी तज्ज्ञांशी संवाद साधला.