

नवी दिल्लीः शंभू बॉर्डवर साधारण आठ महिन्यांपासून धरणं देणाऱ्या शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीकडे निघालेले शेतकरी आणि पोलिसांमध्ये तणाव निर्माण झाला होता. शेतकऱ्यांना शंभू बॉर्डवरच रोखण्यात आलं. त्यामुळे हरियाणा पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता.