
संसदेच्या शीतकालीन अधिवेशनात राज्यघटनेवर विशेष चर्चा करण्यात आली. या चर्चेत काँग्रेस नेत्या आणि वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा यांनी त्यांचे पहिले भाषण केले. त्यांनी संविधानावर आधारित भारतातील संवाद आणि चर्चेच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. प्रियंका गांधी यांची वायनाड येथून खासदार म्हणून निवड झाली आहे.