Manipur Flood Crisis: ईशान्य भारतात पावसाने हाहाकार;अनेक महत्त्वाच्या नद्यांना पूर,भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प

Manipur Weather Disaster : मणिपूरमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुरस्थितीत १९ हजारांहून अधिक नागरिक बाधित झाले आहेत. ३१ मदत छावण्या सुरू करण्यात आल्या असून, इंफाळ नदीला पूर आल्यानंतर अनेक सरकारी कार्यालये, रुग्णालये पाण्याखाली गेली आहेत.
Manipur Flood Crisis
Flood-affected Areas in Northeastesakal
Updated on

मणिपूरमधील तब्बल १९ हजार जणांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. सोमवारी नद्यांना आलेल्या पुरामुळे तीन हजार ३६५ घरांचे नुकसान झाले असून, १९ हजार८११ जणांना पुराचा फटका बसला आहे. प्रशासनाच्या वतीने ३१ मदत छावण्या उभारण्यात आल्या असून, यापैकी बहुतांश छावण्या या पूर्व इंफाळ जिल्ह्यात उभारल्या आहेत. सेनापती जिल्ह्यासह हेंगांग, वांगखै आणि खुरई या गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. मागील चार दिवसांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात विविध ठिकाणी भूस्खलनाच्या ७४ घटना घडल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com