Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निकालात भाजप "तुपाशी" तर उद्धवजींची सेना "उपाशी"
स्थानिक राजकारण कोणत्याही पक्षाच्या दावणीला न बांधता गावात आघाडया तयार केल्या जातात.बडया पक्षांना आम्ही तुमचेच असे सांगितले जाते .त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत वरचष्मा कुणाचा हे सांगणे अवघड असते.खरे जिंकलेले असतात ते कुणाच्याही अध्यात मध्यात नसलेले अपक्ष. ग्रामपंचायत निवडणुका खरे तर कोणत्याही राष्ट्रीय किंवा प्रादेशिक मान्यताप्राप्त पक्षाच्या चिन्हावर लढल्या जात नाहीत तरीही पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांनी स्थानिक आघाडीसह मिळवलेल्या यशाची आकडेवारी देत असतो.
आज निकाल घोषित झाले आहेत आणि भारतीय जनता पक्ष ग्रामीण भागातला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष प्रमुख पाच पक्षांच्या यादीत सर्वाधिक खालच्या पातळीवर गेला आहे.सत्तांतरानंतर सत्तारुढ युतीला नेत्रदीपक यश मिळाले आहे.आमदारांनी त्यांच्या हातात आलेली सत्ता वापरत आपापल्या प्रभाव क्षेत्रात विजय खेचून आणल्याचे चित्र सत्ताधार्यांबाबत स्पष्ट दिसते आहे.भाजप तर विजेता ठरला आहेच पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षालाही घवघवीत यश मिळाले आहे. भाजपला गावपातळीवर कायम स्पर्धा करावी लागते ती राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आजच्या निकालात मात्र भाजपने २३४८ जागा जिंकल्या आहेत पण राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ १२८७ जागा जिंकता आल्या आहेत.
शिंदे गटाला ८४२ तर ठाकरे गटाला ६३७ जागांवरच समाधान मानावे लागले आहे.कॉंग्रेसने ८०९ जागा जिंकल्या. सरपंचपदाच्या एकूण जागा ७,६१९.त्यातील ६९९ जागी निवडणूक बिनविरोध पार पडली.६३ ग्रामपंचायतीत निवडणुकीसाठी एकही अर्ज आला नाही.ग्रामपंचायतीच्या ६५ हजार ९१६ जागांवर सदस्य निवडून द्यायचे होते.काही ठिकाणी मतमोजणी अद्याप सुरु आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.