Congress : गुजरातमध्ये काँग्रेसचा आजवरचा सर्वात दारुण पराभव; 5 मोठी कारणं

990 नंतरची काँग्रेसची सर्वात वाईट कामगिरी
Congress
Congressesakal

गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. पण राजकीय वर्तुळात चर्चा ही काँग्रेसच्या दारुण पराभवाची. गुजरातमध्ये बहुमतासाठी 92 जागांची गरज आहे, तर येथे समोर आलेल्या कलांनुसार भाजप सध्या 150 पेक्षी अधिक जागांवर आघाडीवर आहे. 1990 नंतरची काँग्रेसची सर्वात वाईट कामगिरी असल्याचे म्हटले जात आहे. (Gujarat Assembly Election 5 big reasons Congress defeat in Gujarat )

सध्याची गुजरातमधील परिस्थीती पाहता काँग्रेसची 1990 नंतरची सर्वात वाईट कामगिरी मानली जात आहे. 1990 मध्ये काँग्रेसला 33 जागांवर विजय मिळाला होता.

2017 च्या निवडणुकीत काँग्रेसनं सत्ताधारी भाजपला कडवी टक्कर दिली होती. 1990 नंतरची सर्वोत्तम कामगिरी दाखवत काँग्रेसनं या निवडणुकीत 77 जागा जिंकल्या होत्या. 20 हून अधिक जागांवर पक्षाच्या उमेदवारांचा अल्प फरकानं पराभव झाला होता. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या गुजरातमधील पराभवाची अनेक कारणे आहेत.

पहिलं कारण

गुजरातमध्ये काँग्रेसकडे चेहरा नव्हता. काँग्रेसकडे स्टार कँम्पेनरही नव्हता. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गुजरातमध्ये मोजक्याच सभा झाल्या. राहुल गांधी यांनी गुजरातला महत्त्व अधिक न देता भारत जोडो यात्रेत व्यस्त राहिले. केवळा त्यांनी दोन सभा घेतल्या. बाकी सर्व जबाबदारी त्यांनी युवा काँग्रेसवर सोडली होती.

काही दिवसांपूर्वी, सी-व्होटरनं सर्वेक्षण केलं होतं. यामध्ये, राहुल गांधींच्या प्रचारामुळे गुजरातचे वारे बदलणार का? असा सवाल उपस्थीत करण्यात आला. यावेळी, या प्रश्नाचे अत्यंत आश्चर्यकारक निष्कर्ष सर्वेक्षणातून समोर आले आहेत. सर्वेक्षणात 41 टक्के लोकांनी होय, राहुल यांच्या प्रचारामुळे गुजरातचे वातावरण बदलणार असल्याचं सांगितलं. तर राहुलच्या प्रचारानं गुजरातचे वारे बदलणार नाहीत, असं 59 टक्के लोकांचे मत आहे.

दुसरं कारण

निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये नाराजीचा सुर पाहायला मिळाला. गेल्या पाच वर्षात काँग्रेसमधून 19 आमदार फुटून भाजपमध्ये गेले. त्याचा फटकाही काँग्रेसल बसला. हार्दिक पटेल यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. काँग्रेस सोडताना त्यांनी सोनिया गांधी यांना चिठ्ठी लिहिली होती. त्यात काँग्रेसच्या नेतृत्वावर खासकरून राहुल गांधी यांच्याकडे बोट दाखवण्यात आलं होतं. शिवाय पक्षातील राज्याच्या नेतृत्वावरही आगपाखड करणअयात आली होती.

तिसरं कारण

आजारपणामुळे सोनिया गांधीही गुजरातकडे फिरकल्या नाहीत. त्याचा फटकाही काँग्रेसला बसला आहे. सोनिया गांधी यांनी सुमारे तीन वर्षांपूर्वी 14 डिसेंबर 2019 रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर शेवटच्या जाहीर सभेला संबोधित केले होते. सोनिया गांधी या 9 डिसेंबर रोजी 76 वर्षांच्या होणार असून त्यांची प्रकृती हल्ली ठीक नसते. 2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचाराचा आरंभ करण्यासाठी सोनिया गांधी वाराणसीला गेल्या होत्या. येथील विमानतळावर उतरल्यानंतर 2 ऑगस्ट 2016 रोजी त्यांना पहिल्यांदाच एका राजकीय कार्यक्रमात आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागले होते. सोनियांच्या जाहीर सभांना न येण्याचे कारण त्यांची खराब प्रकृती असल्याचे मानले जात आहे.

चौथं कारण

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेसमधील चाणक्य समजले जाणारे अहमद पटेल यांचं निधन झालं. अहमद पटेल यांना गुजरातच्या मतदारांची नाडी माहीत होती. मते खेचून आणण्याची त्यांची ताकद होती. मात्र, तेच हयात नसल्याने काँग्रेससाठी प्लॅनिंग करणारा नेता उरला नाही, त्याचा फटका या निवडणुकीत काँग्रेसला बसला आहे.

पाचवं कारण

गुजरात केवळ पंतप्रधानांचं होम ग्राऊंड नाही, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचंही होम ग्राऊंड आहे. भाजपने गुजरातमध्ये प्रचारांचा धडाका लावला होता. असा धडाका काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने लावलेला दिसला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com