
अहमदाबाद (पीटीआय) : पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या नागरिकांना परत पाठविण्याची जोरात तयारी सुरू असताना दुसरीकडे गुजरातमध्ये अहमदाबाद आणि सुरतमध्ये छापासत्रात एक हजाराहून अधिक बेकायदा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवी यांनी शनिवारी सांगितले.