

नवी दिल्ली : देशभरात उन्हाचा तडाखा वाढत चालला असून अनेक भागांमध्ये पाऱ्याने चाळिशी ओलांडली आहे. या वाढत्या उष्णतेमुळेच उष्णतेशी संबंधित आजारही बळावण्याची शक्यता असून केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आरोग्यविषयक सुविधा अधिक बळकट करण्याचे निर्देश दिले आहेत.