

नवी दिल्ली : नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश रेल्वे मंडळाने दिले आहेत. फलाट क्रमांक १४ आणि १५ ला जोडणाऱ्या पायऱ्यांवर झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या १८ झाली असून ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य नेत्यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.