काहीतरी चुकतंय! एखाद्याच्या आत्महत्येवर आपण कसं व्यक्त होतो?

suicide
suicide

लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपुत याच्या आत्महत्येमुळे सगळ्यांनाच सुन्न केलं. त्याच्या मृत्यूनंतर अनेकांच्या दु:खद प्रतिक्रिया येणं साहजिकच होतं. मात्र, काहींनी सुशांतच्या मृत्यूवर असंवेदनशील प्रतिक्रिया दिल्या. अशा लोकांचा हेतू काहीही असो, पण त्यांच्या या प्रतिक्रियांमुळे अनेकांना हानी पोहोचू शकते. 

3 वर्षाच्या चिमुकल्याला जवानांनी दहशतवाद्यांच्या गोळीबारातून वाचवलं; व्हिडिओ...
आपण जगाला दोन भागात विभागायला हवं. ज्यांनी आत्महत्या केली आहे आणि ज्यांनी आत्महत्या केलेली नाही. असे अनेक लोक आहेत जे मानसिक तणावाखाली दररोज जगत आहेत. मानसिक तणाव, अन्याय किंवा अत्याचार यामुळे अनेक जण जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतात. आत्महत्या करणाऱ्या लोकांबाबत आपली मतं पूर्वग्रह दुषीत झाली आहेत. आत्महत्येबद्दल असंवेदनशीलपणे बोलून आपण ज्याचा मृत्यू झाला त्याला अनादर तर करतच असतो, पण सध्या जे असुरक्षित आहेत त्यांनाही धोक्यात आणत असतो. 

माध्यमांमध्ये आत्महत्येबाबत वापरल्या जाणाऱ्या भाषेमुळे आत्महत्येचा धोका वाढतो असं काही संशोधनातून स्पष्ट होतं. माध्यमात आत्महत्त्या केलेल्या व्यक्तीचे फोटो दाखवले जातात. त्याने कशा पद्धतीने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येमागे काय कारणे असू शकतात, याचा पाढा माध्यमांकडून वाचला जातो. माध्यमांच्या या प्रदर्शनामुळे असुरक्षित लोक अधिक असुरक्षित वाटून घेऊ लागतात.

समाज माध्यमांमुळे जगभरातील मजकूर वाचण्यासाठी सर्वांना उपलब्ध होत आहे. अनेक जण समाज माध्यमांमध्ये व्यक्त होतात. अनेकजणांचा समाज माध्यमांत एक प्रभाव गट तयार झालेला असतो. त्यामुळे तुम्ही जे काही बोलता ते त्या गटात गंभीरतेने घेतले जाऊ शकते. त्यामुळे आपण एखाद्याच्या आत्महत्येबद्दल काय मत व्यक्त करतोय याकडे लक्ष द्यायला हवं. 

सॅटेलाइटने टिपल्या चीनच्या कुरापती, समोर आली धक्कादायक माहिती
आत्महत्या करणारा व्यक्ती हा गुन्हेगारच असतो, अशी भावना लोकांच्या मनात तयार झाली आहे. आत्महत्या करणाऱ्याला गुन्हेगार ठरवणे असंवेदनशील आहे. तसेच आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे चुकीचे आहे. व्यक्तीच्या आत्महत्तेला केवळ तो व्यक्तीच जबाबदार नसून समाजही तेवढाच जबाबदार असू शकतो. तणावात असणाऱ्या व्यक्तीला आपण दोषी ठरवू शकत नाही. एखाद्याने आत्महत्या केली असं आपण सहज बोलून जातो. पण, त्याला मिळालेले सामाजिक वातावरणही आपण लक्षात घेतले पाहिजे. मानसिक तणावातून जात असतात त्याला मिळालेली सोबत, त्याला कोणीतरी समजून घेणारं भेटणं महत्वाचं आहे. 

एखादा व्यक्तीआत्महत्येचं पाऊल का उचलतो, याबाबतचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. जेव्हा आपण आत्महत्येमागील कारणांची मीमांसा करु, तेव्हा तणावाखाली असणाऱ्या व्यक्तीची आपण मदत करु शकतो. एखाद्या बद्दल मत तणार करण्यापेक्षा त्याचा आपण आधार बनू शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com