कानपूर (उत्तर प्रदेश) : हॅलो पोलिस, मी माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराचा खून केला असून, मला अटक करा, असे एकाने आज (शुक्रवार) पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळावरून संशयिताला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कानपूर जिल्ह्यातील नरौना गावामध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना आज घडली. राजेश कुरील याने त्याची पत्नी सुनिता व तिचा प्रियकर मनीषची हत्या केल्याची माहिती फोनवरून दिली. पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व राजेशला अटक करण्यात आली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पाठविण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.'
राजेशने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, 'पत्नी सुनिता व नातेवाईक असलेला मनीषचे प्रेमसंबध होते. प्रेमसंबधांवरून आमच्या दोघांमध्ये अनेकदा भांडणे होत होती. सुनिताला समजावूनही सांगितले होते. परंतु, दोघांचे भेटणे सुरूच होते. गुरुवारी (ता. 10) रात्री मनीष घरी आला होता. सर्वांनी एकत्र जेवण केले आणि झोपायला गेले. मध्यरात्री धारदार शस्त्राने प्रथम मनीषचा गळा कापून खून केला त्यानंतर पत्नीचा खून केला. दोघांचा खून केल्यानंतर पोलिसांना फोन करून सांगितले.'
दरम्यान, गावामध्ये दुहेरी खून झाल्यामुळे परिसरामध्ये नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.