
नवी दिल्ली : यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये सरासरीइतका पाऊस पडणार असं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ९६ ते १०० टक्के पाऊस पडेल असंही हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
देशभरातील शेतकऱ्यांसह सर्वांसाठीच ही एक आनंदाची बातमी आहे. सध्या अवघा देश कोरोना वायरसच्या संकटाशी लढत असताना सर्वांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. ५ जून ते ३० सप्टेंबर हा पावसाचा कालावधी असेल. असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
यंदा निनोसह सर्वच घटक सामान्य राहणार असल्यानं सरासरी इतका पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. हवामान खात्याचे सचिव माधवन राजीवन यांनी ही माहिती दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.