

LPG Supply Update Amid Hormuz Crisis
esakal
नवी दिल्ली : मध्य-पूर्व आशियातील सुमारे सात आठवडे चाललेल्या युद्ध आणि तणावामुळे भारतातील एलपीजी आयातीवर गंभीर परिणाम झाला असल्याचे पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशाच्या एकूण एलपीजी गरजेपैकी ६० टक्के भाग जागतिक बाजारातून आयात केला जातो आणि त्यातील ९० टक्के होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे येतो. या संकटकाळात एक भारतीय मालवाहू जहाज एलपीजी घेऊन होर्मुझ सामुद्रधुनीत अडकले असल्याने आयात प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. मात्र, या पार्श्वभूमीवरही घरगुती एलपीजी पुरवठा सामान्य स्थितीत सुरू असल्याचे मंत्रालयाने गुरुवारी सांगितले.