India-Pakistan War: महाराष्ट्राच्या प्रमुख ठिकाणांवर रेड अलर्ट, मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द

Mumbai, Security Alert: भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध पेटले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर हल्ला केला. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर करताना पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केले. त्यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानाकडून नापाक कारस्थानं सुरू झाली आहेत.
India-Pakistan War: महाराष्ट्राच्या प्रमुख ठिकाणांवर रेड अलर्ट, मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द
Updated on

पाकिस्तानकडून गुरुवारी रात्री भारताच्या जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान येथील काही भागात ड्रोनने हल्ल्याचा प्रयत्न झाला. भारतीय जवानांनी पाकिस्तानचे हे सर्व प्रयत्न हाणून पाडले आणि आता भारतानेही लाहोरवर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे India-Pakistan युद्ध पेटले आहेत. पाकिस्तानच्या या नापाक कृत्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यात बैठक सुरू आहे. याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणांवर रेड अलर्ट जाहीर केला आहे आणि मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com