
बालासोर- भारताने शनिवारी ओडिशातील बालासोर येथे शौर्य या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अण्वस्त्र सज्ज आहे. हे क्षेपणास्त्र 800 किमी अंतरावरील लक्ष्य भेदू शकते. हे क्षेपणास्त्र सध्या अस्तित्वात असलेल्या क्षेपणास्त्र यंत्रणेला मजबूत करणारे आहे. एलएसीवर चीनबरोबर तणाव सुरु असतानाच भारताने या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे.
सध्या भारताकडे असलेल्या क्षेपणास्त्रांच्या तुलनेत वजनाला कमी आणि हाताळण्यासही हे क्षेपणास्त्र सोपे आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र लक्ष्याकडे झेपावताना अखेरच्या टप्प्यात हायपरसोनिक वेग प्राप्त करतो.
कोरोना लस लवकरच मिळणार; ब्रिटनने दिली चांगली बातमी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर डीआरडीओ सामारिक क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात देशाला पूर्ण रुपाने आत्मनिर्भर करण्याच्या प्रयत्नात आहे.
भारताने याचदरम्यान ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचेही यशस्वी परीक्षण केले आहे. हे क्षेपणास्त्र 400 किमी दूरपर्यंतचे लक्ष्य भेदू शकते. मागील क्षेपणास्त्राच्या क्षमतेपेक्षा 100 किमीने हे अंतर जास्त आहे.
शौर्य क्षेपणास्त्राचे पहिले परीक्षण 2008 मध्ये ओडिशाच्या चांदीपूर येथे करण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबर 2011 मध्ये याचे दुसरे परीक्षण करण्यात आले होते. पूर्वी याची क्षमता 750 किमी इतकी होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.