

8 of India’s Top 10 Tourist Attractions Are Pilgrimage Destinations, Says Latest Data
esakal
भारतातील पर्यटनाचा चेहरामोहरा गेल्या काही वर्षांत वेगाने बदलत आहे. केवळ मनोरंजनासाठी नव्हे, तर श्रद्धा, अध्यात्म आणि सांस्कृतिक वारसा अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर प्रवास करत आहेत. उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या माहितीनुसार, गेल्या एका वर्षात राज्यातील विविध पर्यटनस्थळांना तब्बल १५६ कोटींहून अधिक पर्यटकांनी भेट दिली आहे. कुंभमेळ्यामुळे प्रयागराज, काशी विश्वनाथ कॉरिडॉरमुळे वाराणसी आणि राम मंदिरानंतर अयोध्या या शहरांनी पर्यटनाच्या नकाशावर विशेष स्थान निर्माण केले आहे.