

Madhya Pradesh Health News
sakal
Bhagirathpura Contaminated Water : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये सध्या दूषित पाण्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील भागीरथपुरा भागात गेल्या आठवडाभरापासून दूषित पाणी प्यायल्यामुळे नागरिकांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत असून, आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची व्याप्ती वाढल्याने मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तातडीने दखल घेत जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.