

पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्याने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा चेहरा उघड झाला आहे. याचवेळी, नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार करत शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारताने आपली नौदल शक्ती सज्ज केली असून, अरबी समुद्रात स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत तैनात केली आहे. या हालचालींमुळे पाकिस्तान हादरला आहे.