
राजस्थानातील जयपूरजवळील शाहपूरा परिसरात मानवतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका वृद्ध मातेच्या मृत्यूनंतर तिच्या चांदीच्या बांगड्यांसाठी दोन भावांमध्ये इतकी जोरदार झटापट झाली की त्यांनी स्वतःच्या आईच्या अर्थीलाही स्मशानभूमीत ठेवू दिलं नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.