Joshimath : जोशीमठ खचला, फटका उत्तराखंडच्या तिजोरीला

हिमालयाच्या कुशीतील जोशीमठाकडे पर्यटन, गिर्यारोहण आणि स्कींग या बर्फातील खेळासाठी जगभरातून लोकं आकर्षित होतात.
joshimath scientists claim 30 percent of ancient town is hollow treasury of Uttarakhand
joshimath scientists claim 30 percent of ancient town is hollow treasury of Uttarakhandsakal

जोशीमठ : हिमालयाच्या कुशीतील जोशीमठाकडे पर्यटन, गिर्यारोहण आणि स्कींग या बर्फातील खेळासाठी जगभरातून लोकं आकर्षित होतात. त्यांना चांगल्या पायाभूत सुविधा देण्यासाठी उत्तराखंड सरकारने हेलिपॅडसह स्कीइंगचे आंतरराष्ट्रीय केंद्र विकसित करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजना आखल्या.

मात्र, जोशीमठ परिसरातील जमीन खचल्याने विकास योजनांना खीळ बसल्याची माहिती पुढे येत आहे, त्याचा थेट फटका उत्तराखंडच्या तिजोरीला बसणार असल्याचे दिसते.

केदारनाथ आणि बद्रीनाथ या दोन धामांचे प्रवेशद्वार म्हणजे जोशीमठ. हिमालयातील एका डोंगर उतारावर वसलेलं हे गावं. या डोंगरलाच पुढच्या आणि मागच्या अशा दोन्ही बाजूंनी पंधरा दिवसांपूर्वी तडा गेला. तड्यावर असलेली घरे, हॉटेल, रस्ते खचले. त्यांना भेगा पडल्या. यातून हा प्रदेश अस्थिर झाल्याचे पुन्हा अधोरेखित झाले.

पुढची भीती कोणती?

प्रचंड बर्फवृष्टी सुरू असल्याने सध्या केदारनाथ आणि बद्रीनाथ पर्यटकांसाठी बंद ठेवले आहे. एप्रिल-मेमध्ये ते पुन्हा खुले करण्यात येईल. त्यावेळी जोशीमठ खचत असल्याच्या भीतीने पर्यटक आले नाहीत, तर येथील नागरिकांच्या उपजीविकेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, अशी भीती आता व्यक्त करण्यात येत आहे.

कसा फटका बसला?

डिसेंबर-जानेवारी हा जोशीमठ परिसरातील पर्यटनाचा हंगाम. यंदा पर्यटकांनी याकडे पाठ फिरविली. याचा थेट फटका जोशीमठातील व्यापाऱ्यांना, नागरिकांना बसलाच; पण उत्तरांखडच्या सरकारी तिजोरीलाही बसला. या राज्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवलंबून आहे. ऋषिकेश ते जोशीमठ हा रस्ता मोठा झाला. त्यामुळे १२ ते १३ तासांवरून हा प्रवास सहा ते आठ तासांपर्यंत कमी झाला. त्यातून पर्यटकांनी संख्या वाढली. यावर्षी तुरळक पर्यटक आले.

उत्तराखंडच्या तिजोरीत जोशीमठचा वाटा

केदारनाथ, बद्रीनाथ येथे आलेला प्रत्येक पर्यटक जोशीमठला येतोच. त्यामुळे या भागाने उत्तराखंड सरकारी तिजोरी भरण्यात मोठे योगदान दिले होते. सुमारे २० ते ३० टक्के महसूल या भागातील पर्यटनातून सरकारला मिळत होता. तो यावर्षी पूर्ण बंद झाला.

राज्यापुढे निर्माण झालेले हे नवीन नैसर्गिक संकट आहे. त्याचा फटका या भागातील पर्यटनाला बसत आहे. हा भाग पर्यटनासाठी असुरक्षित असल्याचा संदेश देशात गेल्यास पर्यटक येथे येणार नाहीत. त्यामुळे या भागाचे आणि पर्यायाने राज्याचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

- अजेंद्र अजेय, राज्यमंत्री

जोशीमठाच्या डोंगराचा वरचा भाग असलेल्या औली या ठिकाणी पर्यटन विकासाचे विविध प्रकल्प हाती घेतले होते. जमीन खचल्याने या सर्व प्रकल्पांचा पुन्हा नव्याने आढावा घेण्यात येईल.

- हिमांशू खुराना, जिल्हाधिकारी, चमोली, उत्तराखंड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com