

Kargil Martyr Avnish Yadav Family Expresses Pain Over Unfulfilled Promises on Kargil Vijay Diwas
sakal
बल्लिया, (उत्तर प्रदेश): भारतीय जवानांच्या धाडसामुळे कारगिलमध्ये पाकिस्तानला धूळ चारण्यात यश मिळाले होते. मात्र, मातृभूमीसाठी प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हुतात्मा जवानाच्या कुटुंबांच्या पदरी निराशाच पडल्याचे चित्र आहे. कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या अवनिश यादव या जवानाच्या कुटुंबाने अनेक आश्वासनांची अजूनही पूर्तता झाली नसल्याची खंत २७ व्या कारगिल विजय दिनानिमित्त व्यक्त केली.