Mallikarjun Kharge : काँग्रेसची खरी लढाई भाजप व संघाशी; खर्गे यांची स्पष्टोक्ती: अधिक जागा जिंकल्या असत्या तर सरकार असते
Indian Politics : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप आणि संघाविरोधात लढाई तीव्र करण्याचे आवाहन केले. त्यांनी लोकसभा निवडणुकीत आणखी २०-३० जागा जिंकल्या असत्या तर काँग्रेस सरकार स्थापन करू शकली असती, असे मत व्यक्त केले.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत आणखी २०-३० जागा जिंकल्या असत्या तर केंद्रात आम्ही पर्यायी सरकार देऊ शकलो असतो, असे काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गुरुवारी काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत बोलताना सांगितले.