

Lakhpati Didi
esakal
दृढनिश्चय, कठोर परिश्रम आणि शासकीय योजनांची योग्य साथ लाभल्यास एक सामान्य ग्रामीण महिला देखील उद्योग क्षेत्रात कशी गरुडझेप घेऊ शकते, याचे एक उत्कृष्ट उदाहरण आग्र्यामध्ये समोर आले आहे. आग्रा जिल्ह्यातील पिनाहट ब्लॉकच्या तासोड गावात राहणाऱ्या ३८ वर्षीय राजेंद्री सिंह यांनी २०२० मध्ये सुरू केलेल्या मधमाशी पालन व्यवसायाची वार्षिक उलाढाल आज तब्बल २५ लाख रुपयांवर पोहोचली आहे.
केवळ १० वी पर्यंत शिक्षण झालेल्या राजेंद्री यांचा विवाह वयाच्या २३ व्या वर्षी एका शेतकऱ्याशी झाला होता. त्यांच्या ४ जणांच्या कुटुंबाचा संपूर्ण उदरनिर्वाह केवळ शेतीवर आणि पतीच्या मर्यादित उत्पन्नावर अवलंबून होता.