अखेर १०८ वर्षांनंतर मिळाला जमिनीचा ताबा

तीन एकर जमीनीवर मालकी सांगत १९१४ मध्ये दरबारी सिंह यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता
Land finally acquired after 108 years Judge Shweta Singh favor of Darbar Singh son-in-law Atul Singh
Land finally acquired after 108 years Judge Shweta Singh favor of Darbar Singh son-in-law Atul SinghSakal Digital

पाटणा : जमीनीच्या एका हिश्‍श्‍यासाठी बिहारमधील एका व्यक्तीने न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याचा १०८ वर्षांनंतर निकाल लागला आहे. यामुळे भोजपूर हे गाव सध्या चर्चेत आले आहे. तीन एकर जमीनीवर मालकी सांगत १९१४ मध्ये दरबारी सिंह यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यांनी नथुनी खान नावाच्या व्यक्तीकडून या जमिनीची खरेदी केली होती.

नथुनी यांचा १९११ ला मृत्यू झाल्यावर त्यांच्या वारसांमध्ये संपत्तीवरून वाद निर्माण झाले. या कुटुंबाच्या मालकीच्या असलेल्या नऊ एकर जागेपैकीच तीन एकर जागा दरबारी सिंह यांनी खरेदी केली होती. मात्र, त्यांची जमीनही अडकली. त्यावरून हे प्रकरण न्यायालयात गेले होते. विशेष म्हणजे फाळणीनंतर नथुनी यांचे सर्व वारसदार पाकिस्तानात निघून गेले होते. त्यानंतर ही जमीन ग्रामपंचायतीच्या ताब्यात गेली. त्यानंतरही दरबारी यांच्या चार पिढ्या न्यायालयात लढत होत्या. अखेर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्‍वेता सिंह यांनी दरबारी सिंह यांचे पणतू अतुल सिंह यांच्या बाजूने निकाल दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com