Rajya Sabha : उपराष्ट्रपती धनकड यांनी राज्यसभेत विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यात समन्वयाची आवश्यकता असल्याचे सांगितले. न्यायिक नियुक्त्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे परिस्थिती वेगळी राहिली, असेही त्यांनी नमूद केले.
नवी दिल्ली : कार्यपालिका, कायदेमंडळ आणि न्यायपालिका हे एकमेकांविरुद्ध नाहीत. त्यांना संतुलन आणि नियंत्रणासह समन्वयाने काम करावे लागते, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांनी बुधवारी राज्यसभेत केले.