

Maharashtra Karnataka Border Dispute
esakal
नवी दिल्ली: कर्नाटकसोबतच्या सीमाप्रश्नावरील खटला २००४ पासून प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर या खटल्याची सुनावणी लवकर घेतली जावी, अशी विनंती महाराष्ट्र सरकारकडून मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली.
मराठी भाषक नागरिक मोठ्या प्रमाणात राहत असूनही ८६५ गावे आणि शहरे कर्नाटकात समाविष्ट करण्यात आली आहेत. ही गावे आणि शहरे महाराष्ट्राशी जोडली जावीत, असे मूळ याचिकेत म्हटले आहे. बेळगाव, कारवार आणि निपाणी या शहरांसह सीमाभागातील असंख्य गावांमध्ये मराठी लोक मोठ्या प्रमाणात राहतात.