

New Rural Job Guarantee Scheme Offers 125 Days of Work and Higher Wages
sakal
नवी दिल्ली : ग्रामीण भागातील रोजगाराला चालना देण्याच्या दृष्टीने तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने आणलेल्या ‘मनरेगा’ योजनेची जागा आजपासून ‘विकसित भारत जी राम जी’ योजनेने घेतली आहे. ग्रामीण भागातील मजुरांना एका आर्थिक वर्षात शंभरऐवजी किमान १२५ दिवसांच्या कामाची हमी देणाऱ्या या योजनेसाठी चालू वर्षी सरकारने ९५ हजार ६९२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.