
नवी दिल्ली - कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरून राज्यसभेमध्ये आज गदारोळ झाला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेच्या निमित्ताने विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर हल्ला चढविताना कुंभमेळ्यातील मृत्यूंचा आकडा का सांगितला जात नाही, असा सवाल केला. तसेच. श्रद्धाळूंमुळे नव्हे तर पापी लोक गेल्यामुळे गंगा प्रदूषित झाल्याचा टोला त्यांनी लगावला.