
नवी दिल्लीः मणिपूरमध्ये भाजपने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. भाजप नेते थोकचोम राधेश्याम सिंह यांनी बुधवारी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपाल अजय कुमार भल्लांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती दिली. भाजपसोबत येण्यासाठी ४४ आमदार तयार आहेत, इतर ९ जणांना सोबत घेऊन राज्यापालांना सत्ता स्थापनेचा दावा सांगितला, असं सिंह म्हणाले.