दुधाला देखील हमीभाव द्यावा: राजू शेट्टी

कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकारणीत केली मागणी
raju shetty
raju shettysakal

दुधाला देखील हमीभावाच्या कक्षेत आणावं, २४ पिकांव्यतिरिक्त भाजीपाला फळं आणि दुध यांना देखील हमीभावात समावेश करावा अशी मागणी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केलीय. कोल्हापूर येथे होत असलेल्या स्वाभिमानी संघटनेच्या राज्य कार्यकारीणीमध्ये ते बोलत होते. १ मे ला संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामसभा होणार आहेत. या ग्रामसभेमध्ये दुधाला हमीभाव देण्याचा ठराव करण्यात यावा, किमान दहा हजार ग्रामपंचायतीमध्ये हा ठराव करण्याविषयी शेट्टींनी मार्गदर्शन केलं.

जसा असंघटीत कामगारांसाठी किमान वेतन कायदा आहे. तसाच कायदा संसदेने असंघटीत शेतकऱ्यांसाठी करण्याविषयीचा ठराव देखील ग्रामसभेमध्ये करण्याच्या मोहिमेला सुरुवात करण्याचं सुतोवाच राजू शेट्टींनी केलंय.

किमान हमीभावाचा कायदा देशाच्या संसदेने मंजूर करावा असा ठराव गावसभेत करुन घ्यावा. फक्त सरकार जाहिर करत असलेल्या शेतामालालाच नाही. तर नाशवंत भाजीपाला ज्यात टोमॅटो, वांगी असेल, दोडका, कोबी या सगळ्या भाजीपाल्याला त्याचबरोबर द्राक्ष डाळींब, कांदा अन् बोर अशा फळपिकांना नारळ यांना देखील हमीभाव देण्यात यावा.

raju shetty
राजू शेट्टींची मोठी घोषणा; 'स्वाभिमानी' मविआतून बाहेर

दुधाला देखील हमीभावाच्या कक्षेत आणावं असा कायदा संसदेने करण्यासंबंधीचे हे ठराव घेऊन, दिल्लीला MSP किसान मोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रपतींची भेट घेणार असून त्याची सुरुवात महाराष्ट्रातून होत असल्याची माहिती शेट्टींनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com