
नवी दिल्ली - सरकारी तसेच खासगी क्षेत्रातील उद्योगांमध्ये संप आणि टाळेबंदीमुळे देशभरात मागील तीन वर्षात सुमारे ३७ लाख मनुष्यदिवसांचे काम वाया गेले. यात मागील वर्षी कोरोना संकटामुळे लागू झालेल्या सरकारी टाळेबंदीचाही हातभार मोठा असला तरी त्याआधीच्या दोन वर्षांत सरकारी आणि खासगी उद्योगांना संप आणि टाळेबंदीचा बसलेला दणका लक्षणीय आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राज्यांचे श्रम विभाग तसेच केंद्राच्या विभागीय श्रम आयुक्तांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय श्रम मंत्रालयाने टाळेबंदी आणि संपामुळे वाया गेलेले मनुष्य दिवसांचा तपशील दिला आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये मागील तीन वर्षात टाळेबंदी, संपामुळे ३,०९,५१३ मनुष्य दिवस वाया गेले. यात २०१८ आणि २०१९ या दोन वर्षात सार्वजनिक उद्योगांमध्ये ११ आणि खासगी उद्योगांमध्ये ४ (२०१८ मध्ये) अशी १५ वेळा टाळेबंदी झाली होती. तर कोरोना संकटकालीन देशव्यापी टाळेबंदी असताना २०२० मध्ये चार वेळा सार्वजनिक उद्योगांमध्ये टाळेबंदी झाली.
केरळमध्ये तीन वर्षात फक्त २० वेळा टाळेबंदी झाली असली तरी ८,८०,०७५ मनुष्य दिवसांचे कामकाज सार्वजनिक आणि खासगी उद्योगांमध्ये वाया गेले.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.