
वर्धमान : ‘‘हिंदू हा या देशातील जबाबदार समुदाय असल्याने तो संघटित व्हावा यासाठी संघ प्रयत्नशील आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. एकतेत विविधता समाविष्ट आहे, असे हिंदू समाज मानतो, असे प्रतिपादनही भागवत यांनी यावेळी केले.