

ranchi jungle waterfalls.
sakal
झारखंड : पावसाळा सुरू झाला की निसर्गाचे रूपच बदलते. डोंगर, दाट जंगल, हिरवळ आणि धबधब्यांमधून वाहणारे पाणी यामुळे झारखंडची राजधानी रांची आणि परिसरातील पर्यटनस्थळे सध्या पर्यटकांनी गजबजली आहेत. विशेषतः निसर्गाच्या सान्निध्यात पाण्याचा आनंद घेण्यासाठी तिरू धबधबा, सिकदिरी धबधबा आणि गुंगा नाला या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे.
रांचीच्या आसपास असलेल्या या नैसर्गिक ठिकाणांचे सौंदर्य पावसाळ्यात अधिक खुलते. डोंगरातून वाहणारे पाणी, आजूबाजूची हिरवाई आणि दाट जंगल यामुळे येथे गेल्यानंतर शहरापासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात आल्याचा अनुभव मिळतो.