
कोलकाता : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात झालेल्या वांशिक हिंसाचारामुळे घाबरलेले शेकडो नागरिक पलायन करत असून अनेक जण भागीरथी नदी ओलांडून मालदा जिल्ह्यात आले आहेत. हल्ल्याची भीती असल्यानेच घर सोडून पळून आल्याची व्यथा या नागरिकांनी व्यक्त केली आहे.