

PM Narendra Modi
sakal
नवी दिल्ली : ‘‘एआय परिषदेच्या निमित्ताने ८० हून अधिक देशांतील लोक दिल्लीत आले होते. दुसरीकडे काँग्रेसच्या परिसंस्थेने काय केले? तर एका जागतिक कार्यक्रमाला या पक्षाने आपल्या गलिच्छ राजकारणाचा आखाडा बनवले,’’ अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मेरठमध्ये झालेल्या ‘नमो भारत कॉरिडॉर’च्या उद्घाटनप्रसंगी आयोजित जाहीर सभेत बोलताना केली.