

PM Narendra Modi
sakal
भागलपूर/अरारिय : विरोधकांच्या मनात घुसखोरांबद्दल सहानुभूती आहे, मात्र प्रभू श्रीराम आणि छटी मय्या यांच्याबद्दल त्यांच्या मनात प्रेम नाही.कारण त्यांना मतपेढीचे राजकारण करायचे आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बिहारमधील सभांमध्ये केला. भागलपूर आणि अरारिया जिल्ह्यात भाजपच्या उमेदवारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभांतील उपस्थितांना पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले.