

नवी दिल्ली, ता. १० ः येत्या दोन वर्षांमध्ये भारतातील लॉजिस्टिक खर्च नऊ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते परिवहन व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज ॲमेझॉनने आयोजित केलेल्या संभव शिखर संमेलनात बोलताना दिली.
‘‘भारतात लॉजिस्टिक खर्च (उत्पादनांच्या वाहतुकीवरील खर्च) १६ टक्के आहे, युरोप-अमेरिकेत १२ टक्के तर चीनमध्ये आठ टक्के आहे. येत्या दोन वर्षांमध्ये हा खर्च नऊ टक्क्यांवर आणण्याचे आमचे लक्ष्य आहे. दिल्ली ते डेहराडून हे अंतर पार करण्यासाठी सध्या नऊ तास लागतात.