''भारताशिवाय जगातील कोणतीही मोठी समस्या सुटू शकत नाही''

भारत-जर्मनी संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक असल्याचेही डॉ. लिंडनर म्हणाले.
Dr. Lindner,
Dr. Lindner, Sakal

नवी दिल्ली : जगातील कोणतीही मोठी समस्या भारताशिवाय सुटू शकत नाही, त्यामुळे भारत (India) हा महत्त्वाचा मित्र देश आहे, असे गौरोद्गार जर्मन फेडरल परराष्ट्र कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. टोबियास लिंडनर (Tebias Lindner) यांनी काढले आहेत. ते नवी दिल्ली येथे बोलत होते. (German State Minister Dr. Lindner On India )

लिंडनर म्हणाले की, आम्हाला भारतासोबत तंत्रज्ञान, शिक्षण, सुरक्षा आणि हवामान बदलाबाबत सहकार्य करायचे असून, भारताशिवाय कोणतीही मोठी समस्या सुटू शकत नसल्याचे ते म्हणाले. भारत हा एक महत्त्वाचा भागीदार असून, भारत-जर्मनी संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक असल्याचेही डॉ. लिंडनर म्हणाले. पंतप्रधान मोदींच्या बर्लिन दौऱ्यादरम्यान, दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करू असेही लिंडनर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com