वीजटंचाईवरून केंद्र सरकार - दिल्ली सरकार आमनेसामने

केजरीवाल सरकारने व्यक्त केल्यानंतर बुधवारी केंद्राने वीजपुरवठ्याचे आकडे दिले.
desh
deshSakal

नवी दिल्ली : केंद्र सरकार (Central Government) आणि दिल्ली (Delhi Gov) सरकारमध्ये आता वीज टंचाईवरून वाद होत आहे. दिल्ली अंधारात जाणार असल्याची भीती मंगळवारी केजरीवाल सरकारने व्यक्त केल्यानंतर बुधवारी केंद्राने वीजपुरवठ्याचे आकडे दिले.

कोळशाची टंचाई उद्भवल्याने देशभरात वीजटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. त्यात राजधानीच अंधारात जाणार असल्याचा दावा केजरीवाल सरकारने केला होता. त्याची तत्काळ दखल घेत केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने 'फॅक्टशीट' माध्यमांना दिले. त्यात म्हटले आहे, की दिल्लीच्या विजेची गरज ही ४६८३ मेगावॉट आहे.

desh
नाशिक : मातोरी रोडवरील शेतकरी चार दिवसांपासून अंधारात

दिल्लीकडे ११ ऑक्टोबरला १०१.९ दशलक्ष युनिट वीज उपलब्ध होती. त्या तुलनेत मागणी ही १०१.१ दशलक्ष युनिट होती. गेल्या चौदा दिवसांतील विजेची उपलब्धता तेवढीच होती. सोमवारी गरजेपेक्षा वीज अधिक होती, असे दाखवत केंद्राने दिल्ली सरकारला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com